Ratnagiri Sindhudurg Municipal Election Shinde Sena Rane Panel Victory | सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीतेश राणेंना मोठा धक्का: भाजपचे 2 नगराध्यक्ष विजयी, शिवसेनेचे 4 जागांवर वर्चस्व; तर ठाकरे गटाचा धुव्वा – Mumbai News



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून, कोकणात पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेने आणि राणे समर्थकांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेने 4, भाजपने 2 आणि काँग्रेसने 1 जागा जिंकत नगराध्यक्षपदावर

.

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपचे आमदार आणि राज्याचे मंत्री नीतेश राणे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांच्यात सामना झाला. निवडणुकीच्या प्रचारावेळी नीलेश राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्याची घरी स्टिंग ऑपरेशन करत पैशांची बॅग पकडली होती. त्यावेळी भाजपने संस्कृती बिघडवली, भाजपकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यावेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये अनेकदा खटके देखील उडाले होते. आज निकालानंतर याबाबत नीलेश राणे यांना विचारले असता, त्यांनी “आज केवळ विजयाचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे,” असे म्हणत वादावर पडदा टाकला.

हा माझ्या एकट्याचा नाही, जनतेचा विजय

मालवण नगरपरिषदेच्या 15 पैकी 10 जागांवर नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवला, तर भाजपला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. या विजयानंतर बोलताना नीलेश राणे म्हणाले, “हा जनतेचा विजय आहे. लोकांनी आशीर्वाद दिलेत. आमचे सगळे सहकारी आणि नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे. हा माझ्या एकट्यचा नाही, तर जनतेचा विजय आहे.”

कणकवलीच्या निकालावर ‘मिश्र’ भावना

कणकवली नगरपरिषदेत भाजपला 15 पैकी 8 जागा मिळाल्या असल्या, तरी नगराध्यक्षपदी नीलेश राणे यांच्या ‘शहर विकास आघाडी’चे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले आहेत. या निकालावर नीलेश राणे यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. “आज माझ्या एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू. मालवणमधील विजयाचा शंभर टक्के आनंद आहे, पण कणकवलीत आमच्या काही लोकांचा पराभव झाला याचे दुःखही आहे. आम्ही पाठिंबा दिला होता, पण समोर भाजपमध्ये लढणारेही आमचेच कुटुंब होते. नाते एका बाजूला आणि निवडणूक एका बाजूला होती. आता आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आजचा दिवस जरी आनंदाचा असला, तरी पुढील पाच वर्ष लोकांना रिझल्ट देण्यासाठी उपयोगी आणायची आहेत. त्यासाठी मेहनत घेऊ,” असे नीलेश राणे म्हणाले.

ठाकरे गटाचा ‘व्हिजन’अभावी धुव्वा

या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. यावर टीका करताना नीलेश राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. “उद्धव ठाकरे गटाला फारेस यश मिळाले नाही आणि त्यांना ते मिळणारच नव्हते. कारण त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नव्हता, व्हिजन नव्हतो. कशाासाठी निवडणूक जिंकण्यासाठी याबाबत त्यांच्याकडे प्लॅन नव्हता. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. नेतृत्वाचा अभावा होता. आपसांत गटबाजी मोठ्या प्रमाणात होती. एकसंघ म्हणून ठाकरे गट कधीच लढला नाही, अशी टीका नीलेश राणे यांनी ठाकरे गटावर केली,” असा हल्लाबोल त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *