![]()
विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मंदिर कार्यालयात विशेष नियोजन आणि आढावा सभा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांन
.
या सभेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘स्वच्छ बहिरम’ अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके नेमण्याच्या सूचना दिल्या. यात्रेच्या काळात कुठेही अस्वच्छता होणार नाही आणि प्लास्टिकचा वापर टाळला जाईल, याची काळजी घेण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वच्छता राखण्यावरही विशेष भर देण्यात आला.
या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बायस, गटविकास अधिकारी डॉ. निलेश वानखडे, उपविभागीय महसूल अधिकारी बळवंत अरखराव, एबीडीओ गणेश घोगरकर, यात्रा व्यवस्थापक रामेश्वर रामागड, शिरजगाव कसबाचे ठाणेदार गवई यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, बांधकाम उपअभियंता, पाणीपुरवठा उपअभियंता, ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन तसेच विद्युत विभाग आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला यात्रेतील खानावळी आणि हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कडक भूमिका घेण्याचे निर्देश दिले. सर्व खानावळींची नियमित तपासणी करून स्वच्छतेचे नियम पाळले जात असल्याची खात्री करावी, असे त्यांनी सांगितले.
वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेबाबत बोलताना, शनिवार आणि रविवारी यात्रेत मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी पोलीस विभागाला विशेष पार्किंग व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.
यात्रेचे ठिकाण जंगल परिसराजवळ असल्याने माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले. तसेच, भाविकांच्या माहितीसाठी मंदिर प्रशासनाने परिसरात ठिकठिकाणी सूचनाफलक लावावेत, असेही निर्देश देण्यात आले.
