वादळाने केळीचे पीक उद्ध्वस्त; घरांवरील पत्रे गेली उडून:जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याला बसला वादळी पावसाचा तडाखा
![]()
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजेनंतर आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा अक्षरश: झोपल्या आहेत. दानापूर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथे अल्पभूधारक शेतकरी प्रमोद गुणवंत अवताडे यांच्या घराला या वादळाचा मोठा फटका बसला असून, त्यांच्या घरावरील छप्पर लोखंडी अँगलसह उडून गेले आहे. या घटनेत घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्या कुटुंबासमोर जगण्याच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अकोट ८.३ तेल्हारा ८.० बाळापूर ८.७ पातूर १०.४ अकोला ८.९ बार्शीटाकळी ९.९ मूर्तिजापूर ९.७ एकूण ९.१ सर्वसामान्यांचे प्रचंड नुकसान याव्यतिरिक्त, तेल्हारा शहरातील उंबरकर नगर परिसरातील एका गोदामावरील पत्रे या वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत. अचानक आलेल्या या भयंकर वादळामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करुन ठेवली आहे. या नैसर्गिक संकटामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
