श्रीकृष्ण- सुदामा भेटीने माहेश्वरी भवनाच्या भागवत कथेचे समापन:भागवताचे चिंतन हीच जीवनाची फलश्रुती: पू. राजेशकृष्ण
![]()
पुराणात भागवत हे श्रेष्ठ पुराण असून, यात सदा भगवान श्रीकृष्ण विराजमान असतात.अश्या भागवतचे सदा चिंतन करून भगवंताची प्राप्ती करावी असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे आयोजित भागवत कथेत बोलत होते. भागवतकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची भक्तीभावात पूर्णाहुती ने सांगता झाली.यात त्यांनी सुखी जीवनाचे रहस्य सांगून सुदामा चरित्र कथन करुन या सात दिवसीय भागवत कथेची सांगता केली. या भागवत कथेत पू. राजेशकृष्णजी महाराज यांनी कुंती चरित्र, सुखदेव परीक्षित मिलन, प्रल्हाद चरित्र, वामन अवतार, राम जन्म, कृष्णजन्म, कृष्ण बाललीला, महारास,उद्धव गोपी संवाद,रुक्मिणी विवाह व सुदामा चरित्र आदी कथन करण्यात आले. तसेच विहंगम झाक्या सादर करण्यात आल्यात. संचालन मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती आरती जाजू यांनी व आभार मंडळाच्या सचिव सौ शोभा बियाणी यांनी मानलेत.यावेळी आयोजित महाप्रसादाचा शेकडो भक्तानी लाभ घेतला. उत्सवाच्या सफलतेसाठी माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, आरती जाजू, सहसचिव सुनिता हेडा, राधा टावरी, कोषाध्यक्ष अनिता गांधी, सल्लागार हेमा खटोड, शिल्पा चांडक समवेत महिला मंडळाच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. समारोपीय सोहळ्यात श्रीकृष्ण सुदामा भेटीची भजने समारोपीय सत्रात यावेळी श्रीकृष्ण सुदामा भेटीची भजने सादर करून जल्लोष साजरा करण्यात आला. महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ वंदना हेडा यांनी करून या कथा उत्सवाची सांगोपांग माहिती दिली. कथास्थळी पूर्णाहुती निमित्ताने होम हवन करण्यात आले. यात कथेचे मुख्य यजमान मीना उमेश टावरी, कृष्णा किशोर लाहोटी,पोथी यजमान लीला रमेश मालपाणी, अनुराधा आशीष बाहेती, अनुसया कुंजीलाल जाजू, नितीशा पंकज कोठारी यांनी आहुती दिली. या सप्ताहात ६ दिवस भोजन प्रसादी जाजू परिवारच्या स्व. ब्रजलता जाजू यांच्या स्मृतिीत देण्यात आले. या उत्सवात उद्योजक निखिलेश मालपानी, ध्वनी शिल्पी, सुरेश राठी, गणेश, गोविंद, ठाकुर,शोभाबाई,सुनीता , गजानंद, गोपाल,श्रीराम भैया, गोपाल सोमाणी आदींनी सहकार्य केले.
