Sunetra Pawar | सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा; बारामती विजयानंतर मोठा निर्णय!
Sunetra Pawar | राज्याच्या राजकारणातील एक मोठी घडामोड समोर आली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी आपला राजीनामा सादर केला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
राजीनाम्यामागील प्रमुख कारणे
सुनेत्रा पवार यांनी खासदारकी सोडण्यामागे काही महत्त्वाची कायदेशीर आणि राजकीय कारणे आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्याने आता त्या विधानसभेच्या अधिकृत सदस्य झाल्या आहेत. नियमानुसार, एकाच वेळी संसद आणि विधीमंडळ अशा दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व भूता येणार नाही, म्हणून त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा त्याग केला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच त्या पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणूनही कार्यरत आहेत. राज्याच्या राजकारणात पूर्णवेळ सक्रिय राहण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
बारामतीत रचला नवा इतिहास
पवार कुटुंबाचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीत सुनेत्रा वहिनींनी केवळ विजय मिळवला नाही, तर मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी अजित पवार यांनी १ लाख ६५ हजार मताधिक्यांचा विक्रम केला होता. सुनेत्रा पवार यांनी या पोटनिवडणुकीत १,१८,९३० मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवत एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. पोटनिवडणुकीच्या इतिहासात इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या आहेत. त्यांच्या या विजयाने बारामतीकरांचा पवार कुटुंबावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
आगामी राजकीय वाटचाल
सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत हा विजय साजरा केला. उपमुख्यमंत्री म्हणून आता सुनेत्रा पवार राज्याच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्नांसाठी कशा प्रकारे काम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
