उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे गेला:ते अडीच वर्षे घरी बसले हे राऊत अभिमानाने सांगतात- नवनाथ बन

0
new-project-2026-04-28t115726138_1777704536.jpg




अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानाने सांगत आहेत. शरद पवारांनी लिहलेले पुस्तक वाचा, जेव्हा गरज होती त्यावेळी मुख्यमंत्री घरात बसले असा उल्लेख त्यांनी केला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कारभारावर टीका केली, असे भाजप्र प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे गेला. महाराष्ट्राचे आतोनात नुकसान झाले हे तुमचेच सहकारी म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यात विकासाचा वेग कायम ठेवला आहे. मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, बीडीडी चाळ पुनर्विकास यांसारखे मोठे प्रकल्प प्रत्यक्षात उतरवले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार ‘स्थगिती सरकार’ म्हणून ओळखले गेले. अमित शहांचा आत्मविश्वास विरुद्ध राऊतांचा भ्रम नवनाथ बन म्हणाले की, अमित शहा यांचा आत्मविश्वास काय आहे हे जनतेने पाहिले आहे. संजय राऊत यांचा काय आत्मविश्वास होता हे जनतेने पाहिले आहे. 25 वर्षे आमचीच सत्ता राहणार. मुंबई मनपावर आमचाच झेंडा फडकेल. तुमच्या आत्मविश्वासाला जनतेने कुलुप लावले आहे. शहा हे जनतेमध्ये असतात त्यांना जनता जाणते, पश्चिम बंगालमध्ये आमचे सरकार येणार आहे. कारण जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे. तुमच्या विचारांना तडे गेले नवनाथ बन म्हणाले की, हुतात्मा स्मारकाची डागडुजी करण्याची गरज आहे. ते करण्याचे काम मुंबई मनपा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच केले जाईल. परंतु संजय राऊत तुमच्या पक्षाच्या विचारांना गेलेल्या तड्यांना डागडुजी करण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. तुमची वैचारिक सुंता झाली असून तुमच्या विचारांना तडे गेले आहेत. हिंदूत्ववादी विचार सोडून तुम्ही औरंगजेब आणि अफजल खानाचे विचार सांगण्याचे काम तुम्ही करत आहात. तुम्हाला मुजरे करण्याची सवय नवनाथ बन म्हणाले की, पत्रकार परिषदेमध्ये अदानी आणि अंबानी यांच्यावर टीका करायची आणी त्यांच्या घरी जात मुजरे घालायचे आणि डान्स करण्याची तुम्हाला सवय झाली आहे. मुंबईतील कोणतीही जमीन कोणाला दिली जाणार नाही. कोणाच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात येणार नाही. तुम्हाला उद्योजकांवर रोष असेल तर उद्धव ठाकरेंना विचारा का त्यांचे स्वागत का केले. डान्स का केला. जमीनी कोणाला देणार नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे. मोदींचे नेतृत्व सक्षम नवनाथ बन म्हणाले की, युद्धाच्या काळात महागाईची झळ सामान्य माणसांना बसू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानमध्ये जाऊन बघा तिथे 500 रुपये लीटर पेट्रोल झाले आहे. बांगलादेश, श्रीलंकेत काय परिस्थिती आहे बघा. मोदींच्या नेतृत्वात असे भाव झाले नाही, त्याचे कधीतरी कौतुक करा. अडीच वर्षांच्या विलंबाची जबाबदारी टाळू नका नवनाथ बन म्हणाले की, मुंबई–पुणे प्रवासाला गती देणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी झालेल्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठेपण दाखवत सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त केली. पण संजय राऊत आणि उबाठा गटाने आत्मपरीक्षण करायला हवे. कारण या महत्त्वाच्या प्रकल्पाला अडीच वर्षे विलंब झाला, आणि त्याची थेट जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed