Heavy Rain Returns to Marathwada; 44 Revenue Circles Affected | मराठवाड्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ: छत्रपती संभाजीनगरसह 44 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, हिंगोलीत सर्वाधिक 52.4 मिमी पाऊस – Chhatrapati Sambhajinagar News

Advertisements
Advertisements


मराठवाड्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. विभागातील तब्बल 44 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 15, नांदेड जिल्ह्यातील 10, हिंगोली जिल्ह्यातील 9, जालना जिल्ह्यातील 9 आणि लातूर जिल्ह्यातील 1 महसूल मंडळांचा स

Advertisements

.

मागील सलग तीन दिवस मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसला. त्याआधी जवळपास वीस दिवस पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली होती. तसेच मराठवाड्यातील लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्येही पुरेसा जलसाठा होऊ शकला नव्हता.

24 जुलैपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आणि संपूर्ण मराठवाडा ओलाचिंब झाला. अनेक छोटे प्रकल्प पाण्याने भरून गेले. काही जिल्ह्यांत नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला.

शनिवारी सकाळी 8 वाजेपासून रविवारी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी 32.9 मिमी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 52.4 मिमी पाऊस बरसला. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात 47.1 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी 15.5 मिमी पाऊस परभणी जिल्ह्यात झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 39.2 मिमी, नांदेड जिल्ह्यात 38.5 मिमी, लातूर जिल्ह्यात 25.7 मिमी, बीड जिल्ह्यात 19.6 मिमी आणि धाराशीव जिल्ह्यात 16.9 मिमी पावसाची नोंद झाली.

अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हयातनगर आणि टेंभुर्णी येथे सर्वाधिक 105 मिमी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाबरा येथे 95 मिमी पावसाची नोंद झाली. श्रावणात झालेल्या या पावसाने शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे.

Advertisements
  • Related Posts

    Shivsena Protest Shivaji Nagar Underpass Water Leak | शिवाजीनगर भुयारी मार्गात पाणी गळती: शिवसेना ठाकरे गटाचे ‘आठवा अजूबा’ आंदोलन, पालकमंत्र्याच्या दबावापोटी घाईत उद्घाटन केल्याचा आरोप – Chhatrapati Sambhajinagar News

    छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज गुरुवार २१ ऑगस्ट रोजी जोरदार आठवा अजूबा आंदोलन करण्यात आले. महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तर…

    Raj Thackeray Proposes Concrete Plan to Solve Mumbai’s Traffic and Parking Problems | अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा: राज ठाकरेंचे CM फडणवीसांना आवाहन- माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा! – Mumbai News

    अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *