Heavy Rain Returns to Marathwada; 44 Revenue Circles Affected | मराठवाड्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ: छत्रपती संभाजीनगरसह 44 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, हिंगोलीत सर्वाधिक 52.4 मिमी पाऊस – Chhatrapati Sambhajinagar News

Advertisements
Advertisements


मराठवाड्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. विभागातील तब्बल 44 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 15, नांदेड जिल्ह्यातील 10, हिंगोली जिल्ह्यातील 9, जालना जिल्ह्यातील 9 आणि लातूर जिल्ह्यातील 1 महसूल मंडळांचा स

Advertisements

.

मागील सलग तीन दिवस मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसला. त्याआधी जवळपास वीस दिवस पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली होती. तसेच मराठवाड्यातील लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्येही पुरेसा जलसाठा होऊ शकला नव्हता.

24 जुलैपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आणि संपूर्ण मराठवाडा ओलाचिंब झाला. अनेक छोटे प्रकल्प पाण्याने भरून गेले. काही जिल्ह्यांत नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला.

शनिवारी सकाळी 8 वाजेपासून रविवारी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी 32.9 मिमी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 52.4 मिमी पाऊस बरसला. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात 47.1 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी 15.5 मिमी पाऊस परभणी जिल्ह्यात झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 39.2 मिमी, नांदेड जिल्ह्यात 38.5 मिमी, लातूर जिल्ह्यात 25.7 मिमी, बीड जिल्ह्यात 19.6 मिमी आणि धाराशीव जिल्ह्यात 16.9 मिमी पावसाची नोंद झाली.

अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हयातनगर आणि टेंभुर्णी येथे सर्वाधिक 105 मिमी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाबरा येथे 95 मिमी पावसाची नोंद झाली. श्रावणात झालेल्या या पावसाने शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे.

Advertisements
  • Related Posts

    Sinhagad Tourist Falls Valley | हैदराबादहून आलेला पर्यटक सिंहगडावर बेपत्ता: हवा पॉइंट जवळ सापडली गौतमची चप्पल, दरीत कोसळल्याची शंका; बचावकार्य सुरू – Pune News

    पुण्याजवळील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. हैदराबादहून आलेल्या एका पर्यटकाचा तानाजी कड्यावरून पाय घसरून तो खोल दरीत कोसळला. गौतम गायकवाड (24) असे या तरुणाचे नाव असून तो…

    Raju Shetti Sends Legal Notice Toll Collection | पुणे ते कोल्हापूर महामार्गावर टोलवसूली बंद करण्यात यावी: राजू शेट्टी यांची मागणी, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा – Kolhapur News

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *