Supreme Court Stay on Mumbai High Court Acquittal; 2006 Train Bomb Blast Accused to Remain Out of Jail | मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट- सुप्रीम कोर्टाची HC च्या निर्णयाला स्थगिती: हायकोर्टाने 3 दिवसांपूर्वी सर्व 12 आरोपींच्या सुटकेचे दिले होते आदेश – Mumbai News

Advertisements
Advertisements


सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारसह या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisements

.

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील सर्वच 12 आरोपींची निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर लगेचच या आरोपींची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला होता. तसेच जनतेतूनही तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे शासनाने तत्काळ या आदेशांविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गुरूवारी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली. तसेच सर्वच आरोपींना नोटीसही बजावली. तसेच सुटका करण्यात आलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात परत पाठवण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट केले.

तत्पूर्वी, महाराष्ट्र सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनीही कोर्टाकडे आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे आदेश देण्याच मागणी केली नव्हती. त्यांनी केवळ हायकोर्टाच्या आदेशांना स्थगिती देण्याची मागणी केली. हायकोर्टाने आपल्या आदेशात नोंदवलेल्या काही निरीक्षणांमुळे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) प्रलंबित असलेल्या इतर खटल्यांवर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद यावेळी मेहता यांनी केला. त्यावर कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा प्रस्तुत प्रकरणातील निर्णय इतर कोणत्याही प्रकरणात उदाहरण म्हणून देता येणार नाही असे स्पष्ट केले.

निकालाच्या दिवशी 2 आरोपींची सुटका

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 21 जुलै रोजी संध्याकाळी 12 आरोपींपैकी दोघांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. पहिला आरोपी एहतेशाम सिद्दीकी याला 2015 मध्ये ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

दुसरा आरोपी मोहम्मद अली जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 12 पैकी नावीद खान नामक आरोपी सध्या नागपूर तुरुंगातच राहणार आहे. तो हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अंडरट्रायल आहे.

साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 189 जणांचा मृत्यू

11 जुलै 2006 रोजी मुंबईतील पश्चिम उपनगरीय गाड्यांच्या सात डब्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 189 प्रवासी मृत्युमुखी पडले होते आणि 824 लोक जखमी झाले होते. हे सर्व स्फोट प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले होते. या घटनेनंतर 19 वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बॉम्बस्फोटाचे 5 फोटो…

स्फोट इतका जोरदार होता की ट्रेनच्या डब्याचे तुकडे झाले होते.

स्फोट इतका जोरदार होता की ट्रेनच्या डब्याचे तुकडे झाले होते.

पोलिसांनी आरोपपत्रात 30 जणांची आरोपी म्हणून नावे दिली होती. त्यापैकी 13 जण पाकिस्तानी नागरिक असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी आरोपपत्रात 30 जणांची आरोपी म्हणून नावे दिली होती. त्यापैकी 13 जण पाकिस्तानी नागरिक असल्याचे आढळून आले.

हे स्फोट खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहिम, बोरिवली, माटुंगा आणि मीरा-भाईंदर रेल्वे स्थानकांजवळ झाले होते.

हे स्फोट खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहिम, बोरिवली, माटुंगा आणि मीरा-भाईंदर रेल्वे स्थानकांजवळ झाले होते.

हे सर्व स्फोट मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले होते.

हे सर्व स्फोट मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले होते.

हे सर्व स्फोट मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात करण्यात आले होते.

हे सर्व स्फोट मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात करण्यात आले होते.

उच्च न्यायालयाचा आदेश… 4 मुद्द्यांमध्ये

  • पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींकडून जप्त केलेले पदार्थ त्यांना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नाहीत.
  • बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेले स्फोटके योग्यरीत्या राखली गेली नव्हती. पुराव्यांचे सीलिंग देखील खराब होते.
  • गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचे प्रकार रेकॉर्डवर आणण्यातही सरकारी वकिलांना अपयश आले आहे.
  • आरोपींकडून घेतलेले जबाब जबरदस्तीने नोंदवण्यात आले आहेत असे दिसते.

प्रेशर कुकर वापरून 7 स्फोट

11 जुलै 2006 रोजी मुंबईत संध्याकाळी 6:24 ते 6:35 दरम्यान एकामागून एक सात स्फोट झाले. हे सर्व स्फोट मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात झाले.

हे स्फोट खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहिम, बोरिवली, माटुंगा आणि मीरा-भाईंदर रेल्वे स्थानकांजवळ झाले. ट्रेनमध्ये लावलेले बॉम्ब आरडीएक्स, अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि खिळ्यांनी बनलेले होते, जे सात प्रेशर कुकरमध्ये ठेवण्यात आले होते आणि टायमर वापरून उडवले गेले.

3 पाकिस्तानी नागरिकांना अटक, त्यापैकी 5 जणांना मृत्युदंडाची शिक्षा

20 जुलै 2006 ते 3 ऑक्टोबर 2006 दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने आरोपींना अटक केली. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये, आरोपींनी न्यायालयाला लेखी माहिती दिली की, त्यांच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब घेण्यात आले. आरोपपत्रात 30 आरोपींना दाखल करण्यात आले होते. यापैकी 13 जण पाकिस्तानी नागरिक म्हणून ओळखले गेले.

सुमारे 9 वर्षे खटला चालल्यानंतर, विशेष मकोका न्यायालयाने 11 सप्टेंबर 2015 रोजी निकाल दिला. 13 आरोपींपैकी 5 दोषींना मृत्युदंड, 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा आणि एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

2016 मध्ये, आरोपींची मुंबई उच्च न्यायालयात धाव, खटला 9 वर्षे चालला

2016 मध्ये, आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले आणि अपील दाखल केले. 2019 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने अपिलांवर सुनावणी सुरू केली. न्यायालयाने सांगितले की या प्रकरणात सविस्तर युक्तिवाद आणि रेकॉर्डचा आढावा घेतला जाईल. 2023 ते 2024 पर्यंत हा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित राहिला, सुनावणी तुकड्या-तुकड्यात होत राहिली.

Advertisements
  • Related Posts

    Raju Shetti Sends Legal Notice Toll Collection | पुणे ते कोल्हापूर महामार्गावर टोलवसूली बंद करण्यात यावी: राजू शेट्टी यांची मागणी, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा – Kolhapur News

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली…

    Sunetra Pawar attends RSS Event; Ajit Pawar Reacts | खासदार सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती: कंगणा राणौत यांनी दिली माहिती, प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांसमोर जोडले हात – Maharashtra News

    खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेच्या ‘राष्ट्र सेविका समिती’ च्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणौत यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *