Chennai Super Kings | CSK चा सलग तिसरा पराभव! कॅप्टन ऋतुराजने कोणावर फोडलं खापर?
Chennai Super Kings | IPL 2026 मध्ये एकेकाळी दमदार कामगिरी करणाऱ्या Chennai Super Kings संघाला यंदाच्या मोसमात अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. सलग तिसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे संघात निराशेचे वातावरण आहे. काल झालेल्या सामन्यात Royal Challengers Bengaluru विरुद्ध सीएसकेला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यामुळे संघाची पराभवाची हॅटट्रिक झाली.
या पराभवानंतर संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड प्रचंड नाराज दिसला. मात्र इतरांवर दोष न ढकलता त्याने या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेतली. “मी जर सुरुवातीला अधिक धावा केल्या असत्या तर सामना वेगळ्या दिशेने जाऊ शकला असता,” असे स्पष्ट सांगत गायकवाडने आपल्या खेळीवरच टीका केली.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना Royal Challengers Bengaluruच्या फलंदाजांनी सीएसकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. Tim David याने आक्रमक फलंदाजी करत नाबाद 70 धावा ठोकल्या. त्याला Devdutt Padikkalच्या अर्धशतकाची उत्तम साथ मिळाली.
याशिवाय कर्णधार रजत पाटीदारने 48 धावांची वेगवान खेळी केली, तर Phil Saltने 46 धावा केल्या. या दमदार फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने 20 षटकांत 250 धावांचा प्रचंड डोंगर उभा केला.
Chennai Super Kings | CSKचा पाठलाग अपयशी :
250 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना Chennai Super Kingsची सुरुवातच खराब झाली. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे संघावर मोठा दबाव आला. सर्फराज खानने 50 धावांची लढाऊ खेळी केली, तर प्रशांत वीरने 43 आणि Jamie Overtonने 37 धावा केल्या.
मात्र या प्रयत्नांनंतरही सीएसकेचा डाव 19.4 षटकांत 207 धावांवर आटोपला. आरसीबीकडून Bhuvneshwar Kumarने प्रभावी गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या, तर कृणाल पांड्या आणि जेकब डफी यांनीही महत्त्वाचे बळी घेतले.
