अहिल्यानगरात भाजपच्या ताकदीसमोर राष्ट्रवादी बॅकफूटवर‎,:राष्ट्रवादीला रायगडची जागा जाण्याची शक्यता असल्याने नगरची जागा जाऊ शकते भाजपकडे‎

0
new-project-2026-05-26t090909220_1779767141.jpg




राज्यातील स्थानिक स्वराज्य ‎संस्थांच्या 17 विधान परिषद‎ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली ‎आहे. राजकीय हालचालींना वेग‎ आला. 18 जून रोजी होणारे मतदान‎ आणि 22 जूनच्या मतमोजणीपूर्वी ‎”महायुती”मध्ये जागा वाटपाचा नवा ‎फॉर्म्युला निश्चित झाल्याचे‎ सूत्रांकडून समजते. महायुतीत ‎भाजप 12, शिवसेना 4 आणि ‎राष्ट्रवादीच्या वाट्याला ‎रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग ‎मतदारसंघाची एकमेव जागा ‎जाण्याची दाट शक्यता आहे, असे‎ झाले तर अहिल्यानगरची हक्काची‎ जागा भाजप स्वत:कडेच ठेऊ ‎शकते.‎ अहिल्यानगरची जागा भाजपकडे ‎जाण्यामागे वरिष्ठ पातळीवरील ‎महायुतीचे अंतर्गत राजकीय गणित ‎कारणीभूत ठरू शकते. महायुतीच्या‎ नव्या फॉर्म्युल्यानुसार सुनील तटकरे‎ हे त्यांचा हक्काचा बालेकिल्ला‎ पक्षाकडे ठेवण्यासाठी कसोशिने ‎प्रयत्न करतील.‎ राष्ट्रवादीला रायगडची एकमेव‎ जागा मिळाली तर दुसऱ्या जागेसाठी ‎‎पाहिजे तसा आग्रह करता येणार‎ नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित‎ पवार यांच्यानंतर या जागेसाठी हट्ट ‎‎धरणारा किंवा भाजपला थेट‎ आव्हान देणारा वजनदार नेता सध्या ‎‎राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे‎ रायगडच्या बदल्यात‎ अहिल्यानगरवरचा दावा सोडणे ‎‎राष्ट्रवादीला भाग पडू शकते. ‎भाजपने ऐनवेळी जर फॉर्म्युल्यात‎ बदल करून राष्ट्रवादीला जागा‎ वाढवून देण्याचा निर्णय घेतल्यास ‎‎अहिल्यानगरची जागा मिळण्याची ‎‎आशा राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ‎‎कार्यकर्त्यांना आहे.‎ फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यास शिवसेनेचीही साथ‎ भाजपसोबत महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचीही चांगलीच ताकद‎ वाढली आहे. त्यांचे शेवगाव नगर परिषद, नेवासे नगर पंचायतीत त्यांचा‎ नगराध्यक्ष आहे. महायुतीतील संभाव्य फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यास ‎शिवसेना शिंदे गटाची ताकदही भाजपच्या पाठिशी राहण्याची शक्यता आहे. या‎ स्पष्ट आकडेवारीमुळे राष्ट्रवादी येथे पूर्णपणे बॅकफूटवर गेली असून, भाजपचा ‎विजय अधिक सुकर मानला जात आहे. 461 पैकी सर्वाधिक‎
199 मतदार भाजपचे‎ गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार‎गट) ताब्यात असलेली ही जागा आता भाजप ‎स्वतःकडे खेचून घेण्याच्या तयारीत आहे. त्यामागे ‎कारणही तसे भक्कम आहे. जिल्ह्यात 11 नगर‎परिषदा, 4 नगर पंचायती आणि छावणी परिषद‎ मिळून एकूण 461 मतदार आहेत. यात एकट्या‎ भाजपचे हक्काचे 199 भाजपचे नगरसेवक‎ मतदार आहेत. यात संगमनेर सेवा समितीचे 33 आणि राहुरीतील जनविकास आघाडीचे 17 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला तर हा आकडा‎ 249 वर जातो. त्यानुसार भाजपचा उमेदवार स्वबळावरही सहज विधान परिषदेवर जाईल.‎ त्यामुळे कागदावर राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपच ‎भक्कम दिसत आहे.‎ शब्द पाळला जाणार की‎
निष्ठावंतांचा पुन्हा “त्याग”‎ जिल्ह्यात राजकीय परिस्थिती पाहता ‎भाजपचे उमेदवार निवडून‎ आणण्यासाठी वेळोवेळी अनेक ‎तडजोडी करण्यात आल्या.‎ याआधीच्या निवडणुकांत मुख्यमंत्री ‎देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन ‎भाजप तसेच मित्रपक्षांच्या‎ उमेदवारांना निवडून आणले.‎ त्याप्रमाणे शब्दाला मान देणाऱ्या‎ नेत्यांना संधी दिली गेली. नुकतेच ‎विवेक कोल्हे यांना विधान परिषदेवर‎ पाठवण्यात आले. आता या जागेवर‎ भाजपने उमेदवार द्यायचे ठरल्यास ‎शब्द पाळला जाणार की निष्ठावंतांना ‎पुन्हा त्याग करावा लागणार हे पाहणे‎ औत्सुक्याचे ठरणार आहे.‎‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed