यावली- सालसे रस्ता अडीच वर्षांतच उखडला; 14 किमी खड्ड्यांचे साम्राज्य:अपघाताचे प्रमाण वाढले, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ बघ्याच्या भूमिकेत‎

0
250_17791939006a0c582c56209_22739878912.jpg




यावली-सालसे राज्य मार्गाची अडीच वर्षाच्या आतच चाळण झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्चून या मार्गाचे काम झाले आहे. मात्र काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील यावली पासून पुढे माढा शहरातून कुर्डूवाडी मार्गे करमाळा तालुक्यातील सालसे गावा पर्यंत हा राज्य मार्ग जोडला गेलेला आहे. मात्र माढ्यापासून कुर्डूवाडी पर्यंतच्या या १४ कि.मी च्या अंतरात ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ताच उखडला गेला आहे. अर्धवट रस्ता, ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.भोसरे मधील बागल वस्तीच्या ठिकाणी रस्ता अर्धवट असल्याने रस्त्यात पडलेल्या गॅप मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या ८ दिवसात लहान मोठे १५ हून अधिक अपघात झाले आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत असून दुर्लक्ष करीत आहेत. दररोज प्रवास करणारे हजारो वाहनधारक मात्र हैराण झाले असून त्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. डांबर उपलब्ध होत नसल्याचे कारण सा.बा.विभागाकडून देण्यात आले असून किमान त्यापूर्वी प्राथमिक स्वरुपात तरी मुरुमीकरण करायला हवे. यावली सालसे राज्य मार्गावरील रणदिवेवाडी, वेताळवाडी, वडाचीवाडी गावच्या हद्दीत रस्ते उखडले गेले असून ठिक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भोसरे मधील बागल वस्तीच्या ठिकाणी रस्ता अर्धवट असल्याने रस्त्यात पडलेल्या गॅप मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या ८ दिवसात लहान मोठे १५ हून अधिक अपघात झाले आहेत. इराणच्या युद्धामुळे डांबराचे दर वाढले ^इराणच्या युद्धामुळे डांबराचे दर ९० हजार ते १ लाख रुपये टन झाले आहेत. डांबरी करायचे राहिले आहे. डांबर शॉर्ट असल्यामुळे ठेकेदाराकडून काम करायचे राहिले आहे. काम करून घेतले जाईल. – आनंद नाझरे,(सा.बा. उपविभाग, कुर्डूवाडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *