Maharashtra Cabinet Reshuffle: Ajit Pawar Says CM Holds Final Say; Manikrao Kokate Decision By Tuesday | मंत्रिमंडळात फेरबदल: मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचे म्हणत अजित पवारांकडून दुजोरा; कोकाटे, सूरज चव्हाण बद्दलही स्पष्टच सांगितले – Mumbai News

Advertisements
Advertisements


राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असून काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले असता या संदर्भातील सर्व अधिकार हे मुख्यमंत्री यांचे अ

Advertisements

.

अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांच्या संदर्भात अजित पवार यांनी सांगितले की, त्यांना सध्या पदावरून काढण्यात आले आहे. त्यांनीही अजून माझी भेट घेतलेली नाही. त्यांना भेटून त्यांची देखील बाजू ऐकणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्याच बरोबर विधिमंडळात रम्मी खेळण्याचा आरोप झालेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही मंगळवारपर्यंत योग्य ती कारवाई करणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात सोमवारी कोकाटे आणि मुख्यमंत्र्यांसोबत आपण चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाकडून झालेला गोळीबार आणि सूरज चव्हाण प्रकरणावर देखील अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले. एखाद्याच्या नतेवाईकाने गोळी चालवली असेल तर त्या नातेवाइकाचा दोष असतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून त्यानंतरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. सूरज चव्हाण यांच्या संदर्भातला निर्णय देखील आपण लवकरच घेणार असल्याचे ते म्हणाले.

विजय गाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट

या संदर्भात अजित पवार यांनी सांगितले की, छावा संघटनेचे विजय गाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझी भेट घेतली. त्यांनी लातूरमध्ये घडलेल्या घटनेची सर्व तपशीलवार माहिती माझ्यासमोर मांडली. त्यांच्या तक्रारी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेत, मी तात्काळ लातूरच्या पोलिस अधीक्षकांना सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, छावा संघटनेच्या इतर मागण्या बाबतही सकारात्मक आणि त्वरित निर्णय घेतला जाईल असा विश्वास मी त्यांना दिला आहे.

Advertisements
  • Related Posts

    Raj Thackeray Proposes Concrete Plan to Solve Mumbai’s Traffic and Parking Problems | अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा: राज ठाकरेंचे CM फडणवीसांना आवाहन- माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा! – Mumbai News

    अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहररावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

    MSEDCL Ganesh Mandal Power Connection Domestic Rates | महावितरणची गणेश मंडळांना भेट: तात्पुरत्या वीज जोडणीसाठी घरगुती दर, सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन – Hingoli News

    सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध् केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी अधिकृत वीजपुरवठा घेऊनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *