राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता:रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल
![]()
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 2008 साली रेल्वे भरतीच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. तसेच राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या प्रकरणातून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या संदर्भात वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरावे आढळून न आल्याने या प्रकरणातील सर्वच आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तसेच सादर करण्यात आलेल्या सीडीला काडीचीही किंमत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचे देखील पुरावे सरकारी पक्षाला सादर करता आले नाहीत. तसेच परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण करणारे मनसैनिक होते हे देखील सिद्ध करता आले नाही. मागील सुनावणीच्या वेळी राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी देखील राज ठाकरे यांनी माझ्यावर लावण्यात आलेले आरोप मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आजच्या निकालाच्या दिवशी राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्ते तसेच अविनाश जाधव देखील उपस्थित होते. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…
