बुलढणा जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना: शेतकरी दांपत्याने एकाच झाडाला गळफास लावत संपवली जीवन यात्रा, गावकऱ्यांवर शोककळा – Buldhana News

Advertisements
Advertisements

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी विरोधी पक्ष आणि विविध शेतकरी संघटनांकडून सातत्याने केली

Advertisements

.

एका शेतकरी दाम्पत्याने आपल्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेवर प्रकाश टाकला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या भरोसा गावात गणेश थुट्टे (वय ५५) आणि त्यांच्या पत्नी रंजना थुट्टे (वय ५०) या शेतकरी दांपत्याने आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पती-पत्नीचे मृतदेह शेजारी-शेजारीच एकाच झाडाला लटकलेले पाहून संपूर्ण गाव सुन्न झाले असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

थुट्टे दांपत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, शेतीत सातत्याने होणारे नुकसान आणि हुमणी अळीमुळे पिकांवर आलेले संकट, यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते अशी चर्चा गावात सुरु आहे. याच नैराश्यातून त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पाऊस सुरू असतानाच ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली, त्यामुळे अंढेरा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत पती-पत्नीचे पार्थिव झाडावरून खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisements
  • Related Posts

    Sinhagad Tourist Falls Valley | हैदराबादहून आलेला पर्यटक सिंहगडावर बेपत्ता: हवा पॉइंट जवळ सापडली गौतमची चप्पल, दरीत कोसळल्याची शंका; बचावकार्य सुरू – Pune News

    पुण्याजवळील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. हैदराबादहून आलेल्या एका पर्यटकाचा तानाजी कड्यावरून पाय घसरून तो खोल दरीत कोसळला. गौतम गायकवाड (24) असे या तरुणाचे नाव असून तो…

    Raju Shetti Sends Legal Notice Toll Collection | पुणे ते कोल्हापूर महामार्गावर टोलवसूली बंद करण्यात यावी: राजू शेट्टी यांची मागणी, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा – Kolhapur News

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *