अशोक खरात प्रकरणाचे पडसाद परदेशातही:नायजेरियासह अनेक देशांत व्हिडिओंचा प्रसार, सायबर पोलिसांची मोठी कारवाई

0
cover-placecover-marathi-6_1780990492.jpg




नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रांचा प्रसार परदेशातही झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या अनेक खात्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. 406 हून अधिक आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या तपासात अशोक खरात प्रकरणाशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणारे तब्बल 74 टेलिग्राम ग्रुप्स आणि विविध सोशल मीडिया अकाउंट्स आढळून आले आहेत. या माध्यमांतून व्हिडिओ आणि छायाचित्रे मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत इंटरनेटवरील अशा पोस्ट हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 406 हून अधिक आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो हटवण्यात यश आले आहे. तसेच 11 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या असून अनेक खात्यांकडून आवश्यक माहिती मागवण्यात आली आहे. तपासादरम्यान काही टेलिग्राम ग्रुप्सवर हे व्हिडिओ अवघ्या 20 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचाही धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. असे व्हिडिओ व्हायरल न करण्याचे आवाहन या प्रकरणाची व्याप्ती केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरती मर्यादित नसल्याचेही तपासात समोर आले आहे. संबंधित व्हिडिओंचा प्रसार भारतातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह युएई, श्रीलंका, फिलिपाईन्स आणि नायजेरिया या देशांपर्यंत झाल्याचे सायबर पोलिसांनी नमूद केले आहे. दरम्यान, नागरिकांनी असे व्हिडिओ डाउनलोड, शेअर किंवा खरेदी करू नयेत, तसेच संशयास्पद लिंक अथवा ग्रुप आढळल्यास तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात एल्गार!:सतेज पाटील-राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. कोल्हापुरात आज (९ जून) शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करणार आहेत. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून, हजारो शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *