बाभळीत पाणी समस्या: स्वतंत्र जलकुंभाची मागणी:राकाँ. शहराध्यक्ष अमोल गहरवार यांच्या नेतृत्वात जीवन प्राधिकरणाला निवेदन

0
0ea86598-37ce-4f94-a142-c9e23486f426_1779638267023.jpg




दर्यापूर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील बाभळी परिसरात अनेक महिन्यांपासून, तर काही भागांमध्ये दोन वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित आहे. या गंभीर पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अमोल अशोकसिंह गहरवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) उपकार्यकारी अभियंता विजय शेंडे यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले. नागरिकांना उन्हाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जुनी व अपुरी जलवाहिनी बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याची, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची आणि ज्या भागांमध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे, तिथे तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. चर्चेदरम्यान, बाभळी परिसरातील वाढती लोकसंख्या, विस्तारित वस्ती आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची टाकी (जलकुंभ) उभारण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. या जलकुंभासाठी आवश्यक प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, अमरावती यांच्याकडे तातडीने पाठवण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. उपकार्यकारी अभियंता विजय शेंडे यांनी निवेदनकर्त्यांच्या समस्येची दखल घेतली. त्यांनी आवश्यक तो प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक पातळीवर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन काळे, आदेश ठाकरे, अमर ठाकरे, गौरव ठाकरे, श्याम ठाकरे, आकाश ठाकरे, ऋषिकेश ठाकूर, विजय भुयार आणि वसीम शहा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed