“इन्स्टाग्रामवर मला लोक म्हणतात की मी दोन वेळा लग्न केलंय आणि माझी मुलगी पाच वेळा लग्न करणार. पण कदाचित ती लग्नच करणार नाही. माझ्यासोबत जे काही घडलंय, ते तिने पाहिलंय. त्यामुळे ती खूप विचारपूर्वक पाऊल उचलणार”, असं श्वेता पुढे म्हणाली.

Image Credit source: Instagram
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारून अभिनेत्री श्वेता तिवारी घराघरात पोहोचली. आपल्या दमदार अभिनयकौशल्यामुळे श्वेताने टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमावलं. मात्र खासगी आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेता तिच्या दोन्ही अयशस्वी लग्नांबद्दल आणि कौटुंबिक हिंसाचाराबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. श्वेताने भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांनी 2007 मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने अभिनव कोहलीशी लग्नगाठ बांधली. मात्र हे नातंसुद्धा फार काळ टिकू शकलं नाही. 2019 मध्ये अभिनव आणि श्वेता विभक्त झाले. श्वेताला पहिल्या लग्नापासून पलक तिवारी ही मुलगी आहे. तर अभिनवपासून तिला रेयांश हा मुलगा आहे.