मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वीच लेखिका नमिता वर्तक यांच्या वडिलांचं निधन झालं. त्या घटनेच्या 16 दिवसांनंतर त्यांनी आईलाही गमावलं. मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. प्रेक्षकांसाठी प्रत्येक एपिसोड रंजक कसा लिहावा यासाठी झटणाऱ्या […]

Milind Gawali
Image Credit source: Instagram
मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वीच लेखिका नमिता वर्तक यांच्या वडिलांचं निधन झालं. त्या घटनेच्या 16 दिवसांनंतर त्यांनी आईलाही गमावलं. मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. प्रेक्षकांसाठी प्रत्येक एपिसोड रंजक कसा लिहावा यासाठी झटणाऱ्या लेखिकेच्या खासगी आयुष्यात किती दु:ख आहे, याविषयी ते व्यक्त झाले. पडद्यामागचं हे दु:ख प्रेक्षकांसमोर कधी येत नाही, असंही ते म्हणाले.