Agricultural Advice | राज्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मेहणतीवर पाणी फिरवत आहे. जोरदार गारपिट आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची (Agricultural Advice) पिके कामातून गेली आहेत. यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. राज्यात आणखी तीन दिवस अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी कशी घ्यावी ही प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. चला तर मग हवामान आधारित कृषी सल्ला (Agricultural Advice) जाणून घेऊयात.
हवामान आधारित कृषी सल्ला
- पावसाचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस या पिकाची काढणी व मळनीची कामे तत्काळ उरकून घ्यावी.
- कापणी व मळणीच्या कामास पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास कम्बाईन हार्वेस्टरद्वारे काढणीची कामे करून घेण्यास प्राधान्य द्यावे.
- कापणी झाली असल्यास व पिक शेतामध्ये पसरले असल्यास शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी जमा करून ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने शेतमाल झाकून ठेवावा.
- कापणी व मळणी केलेला शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
- मेघगर्जनेसह विजांची शक्यता लक्षात घेता शेतामध्ये काम करत असताना दोन व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे.
- मेघगर्जनेची चाहूल लागताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडांखाली आसरा घेणे कटाक्षाने टाळावे.
- शेळ्या, गाय, म्हैस व इतर पाळीव जनावरांना झाडाखाली न बांधता त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.
- जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठया मधेच चारा व पाण्याची उपलब्धता करून घ्यावी.
- गोठ्याची देखभाल आणि दुरुस्तीची कामे 2 दिवसामध्ये पूर्ण करावी.
डाऊनलोड करा ‘हे’ ॲप
विजांच्या ठीकांनांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाईटनिंग अलर्ट (Damini : Lightning Alert) या मोबाईल अॅपचा वापर करावा तसेच विजांपासून बचावासाठी अॅपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा.
दामिनी – लाईटनिंग अलर्ट हे अॅप खालील लिंक वापरून गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड
करावे.
बाजारायोग्य फळे व भाजीपाला पिकाची काढणी करून घ्याव्यात.