
“सरकार कोसळणार म्हणूनच राज्यपालांचा काढता पाय”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबई (Mumbai) भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी आज दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांवर घणाघाती टीका केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उद्घाटनासाठी आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती, असं अमोल मिटकरींनी सांगितलं.
राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवं होतं. पण यानिमित्ताने ते आता जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल. दुसरं असं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर सरकार कोसळले तर त्याअगोदरच आपण काढता पाय घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली असेल, असंही त्यांनी म्हटलंय.
आज स्व. बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त मी साकडे घालतो की, त्यांना लवकर सदबुद्धी मिळो आणि लवकर महाराष्ट्र सोडून त्यांनी राज्याला मोकळं करावं, असं अमोल मिटकरी म्हणालेत.
More Stories
अखेर रेखा बोलली; सिंदूर लावण्यामागचं सांगितलं कारण
[ad_1] मुबंई | 1969 साली ‘अंजाना सफर’ या चित्रपटातून अभिनेत्री रेखाने (Rekha) चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आज 66 व्या वर्षीदेखील रेखा...
भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे....
ब्रेकअपनंतर मुलींमध्ये हा मोठा बदल होतो?
[ad_1] नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी...
चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्या जॅकेटचीच; ‘हे’ आहे कारण
[ad_1] नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8...
‘या’ कारणांमुळं करीनानं तब्बल 3 वेळा नाकारलं होतं सैफचं प्रपोज
[ad_1] मुंबई | बाॅलिवूडची(Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची(Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. तर बाॅलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, म्हणाले…
[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी...