
मुंबईत दुस-या डोसनंतर फक्त २६ कोरोनाबाधित
मुंबई : कोरोना व्हायरसवर लसच एकमेव प्रभावी शस्त्र असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जगभरात लसीकरणावर सर्वांत जास्त जोर दिला जात आहे. याची प्रचिती मुंबई येथे आली असून दुस-या डोसनंतर केवळ २६ जण कोरोनाबाधीत झाले असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने १ जानेवारी ते १७ जूनदरम्यान सुमारे ३ लाख कोरोनाबाधीतांचा सर्वे केला. दरम्यान, यात लसींचा दुसरा डोसच नव्हे तर पहिला डोस ही अधिक चांगले कार्य करत असल्याचे दिसून आले.
सर्वेक्षणानुसार २.९ लाख लोकांमधून २६ लोक दुसरा डोस घेतल्यानंतर तर १० हजार ५०० लोक पहिला डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले. मुंबईत १ जानेवारी ते १७ जूनदरम्यान सुमारे ४४ लाख ९४ हजार १२३ लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली होती. विशेष म्हणजे यातील केवळ ०.२३ टक्के कोरोनाबाधीत झाले होते.
मुंबईत १० लाख लोकांना दोन्ही डोस
राज्यात गेल्या काही दिवसांपासून १८ ते ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरु आहे. सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत आतापर्यंत ५३.८३ लाख लोकांचे लसीकरण झाले असून यातील १० लाख लोकांना कोरोना लसींचे दोन्ही डोस दिले गेले आहेत.
More Stories
घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागले
नवी दिल्ली : एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असताना इंधन, गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ सुरुच आहे. आज एलपीजी गॅसच्या दरात पुन्हा...
ओबीसी आरक्षणाबाबत समर्पित आयोगाचा नांदेड दौरा
नांदेड - महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरीकांच्या...
एन्काऊंटर ची धमकी देणारे पो. नि. अशोक घोरबांड यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषण.
नांदेड - माझ्या नातेवाईकांवर केस करतोस का केस गुमान मागे घे अन्यथा तुझे एन्काऊंटर करीन अशी उघड धमकी देणारे पोलीस...
बुद्ध जयंती निमित्त शाहुनगरात पणतीज्योत रॅली व खिरदान
नविन नांदेड - सिडको-हडको वाघाळा शाहूनगर भागातून तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य पणतीज्योती रॅली काढण्यात आली व खीर दान...
कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन
बंगळुरू : कन्नड मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या २१ व्या वर्षी अखेरचा...
श्रीलंकेत १ दिवस पुरेल इतकेच पेट्रोल
आर्थिक स्थिती बिकट, पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केले देशाला संबोधित कोलंबो : भारताचा दक्षिणकेडील शेजारी देश श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब झाली...