
मनसे-भाजप युती? चंद्रकांत पाटीलराज ठाकरे भेटीनंतर पाटलांनी केलं स्पष्ट
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा एकदा मुंबईत भेट झाली. या भेटीनंतर नेहमिप्रमाणेच भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चांना ऊधान आले. परंतू चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.
राज ठकारेंची मुंबईत भेट घ्यायची हे अगोदरच ठरले होते. परंतू या भेटीदरम्यान युतीबाबत चर्चा झाली नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगीतले आहे. तसेच भाजपचा युतीबाबतचा आग्रह कायम आहे. मनसेने परप्रांतीयांबाबतची भूमिका व्यापक करावी. त्यानंतरच युतीचा विचार केला जाईल. असेसुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले.
मनसे-भाजो युतीची चर्चा झाली नाही असे जरी चंद्रकांत पाटील म्हणाले असले तरिसुद्धा भेटीमागचे मुख्य कारण हेच असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय दोन राजकीय नेते भेटणार तेव्हा राजकीय विषयांवर चे्चा होणारच असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
राज ठाकरे यांनी व्यापक भूमिका घ्यावी असे मी त्यांना सुचवले. राज ठाकरे महाराष्ट्रासाठी आश्वासक चेहरा आहे. परप्रांतीयांबद्दल त्यांच्या मनात कसलीही कटुता नाही. एकत्र येण्याबद्दल विशेष काही बोलणे झाले नाही. युतीबाबतसुद्धा चर्चा झाली नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगीतले.
More Stories
5जी लाँचच्या आधीच स्वदेशी 6जीची तयारी
नवी दिल्ली : 5जी नेटवर्क लवकरच भारतात रोलआऊट होणार आहे. जीओ, एअरटेल, व्हिआय या तिन्ही कंपन्या आता 5जीच्या तयारीत व्यस्त...
संजय राठोडांना मंत्रिपद?; फडणवीसांनी दाखवले मुख्यमंंत्र्यांकडे बोट
पुणे : शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. पण, ज्या नेत्याविरोधात भाजपने आरोपाचा धुरळा उडवला होता, त्याच संजय...
प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश...
पॉपस्टार ओलिविया न्यूटन जॉनचे ७३ व्या वर्षी निधन
नवी दिल्ली : चित्रपटातील ७० च्या दशकातील सर्वात मोठ्या पॉप स्टारपैकी एक आणि चार वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिका आणि...
अखेर शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार
मुंबई : ठाकरे सरकारला पायउतार करून सत्तेत आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे ११ वाजता पार पडला....
मंत्र्यांनी आता राज्यातील विकासाची कामे करावीत
मुंबई : अखेर आज राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ...