
खरेदी मालाच्या पैशासाठी आडत व्यापा-यांकडून कडकडीत बंद
नांदेड: प्रतिनिधी
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खरेदी केलेल्या मालाचे पैसे शेतक-यांना वेळेवर मिळत नसल्यामुळे तसेच बाजार समितीच्या एका संचालकाने अपशब्द वारल्यामुळे व्यापा-यांनी सोमवार दि.३ जानेवारी रोजी आपली अडत दुकाने बंद ठेवली होती. मागच्या दिवसापासुन हळदीचे व्यापारी उशिरा पेमेंट देत असल्याने शेतक-यांना व अडत्यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.
२४ तासात शेतक-यांना आपल्या मालाचे पैसे मिळाले पाहीजे असा नियम आहे. पंधरा दिवसात एक रूपया कपात करू न व पंचवीस ते तीस दिवसाला काहिही न कपात करता पेमेंट करण्याचा निर्णय अडते खरेदीदार व प्रशासनात झाला होता. परंतु स्थानिक तडजोडीनुसार बाजार समितीत पेमेंट होत नाही. दीड दोन महिन्याला पेमेंट होत असल्याने वाद निर्माण होत आहे. तसेच नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकाने अडत्यास अपशब्द वापरल्याने अडत्यात संताप पसरला होता. त्यामुळे या कारणास्तव सोमवार दि. ३ जानेवारी रोजी अडत असोशियशनच्या वतीने बाजार समितीतील बीट, काटे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी नवा मोंढ्यातील सर्व अडत दुकाने बंद ठेवुन अडत्यांनी याचा निषेध व्यक्त केला.
More Stories
आता शिंदे गटाकडूनच व्हीप
शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यात हजर राहण्यास सांगितले मुंबई : पक्षात फूट पाडल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांविरोधात नवा डाव...
सिटी चिटस् च्या वतीने रंगणार उद्या डॉक्टरांचा सन्मान सोहळा
हॉटेल मिडलँड, स्टेडीअम रोड, येथे शनिवार , सायंकाळी ६.०० ,वा, २ जुलै , २०२२ रोजी आयोजन...! नांदेड – बातमीदार नांदेडातील...
अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे संपन्न
इंदापूर : दोन वर्षानंतर प्रथमच झालेल्या या रिंगण सोहळ्यात वारक-यांमध्ये उत्साह दिसून आला. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज...
देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात समावेश घेणार नाहीत
मुंबई : शिवसेने एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असून सायंकाळी ७.३० मिनीटांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार...
रिक्षाचालक, नगरसेवक ते मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे यांचा प्रवास
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल...
फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?
मुंबई : राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये अखेर उद्धव ठाकरे सरकार पायउतार झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा...