
‘अमृता फडणविसांची संकटात राजकीय शेरोशायरी; सत्तेची लालसा दिसून येते’
तौक्ते चक्रीवादळाचे संकट राज्यावर ओढावले आहे. संकटात अमृता फडणवीस यांनी संवेदशीलता दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करतात. यामधून त्यांना असणारी सत्तेची लालसा दिसून येते. माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीने संकटातत असे वागणे योग्य नाही, अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे चे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.
उमेश पाटील यांनी सौ. फडणवीस यांचा वर चांगलेच तोंडसुख घेतले. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल, तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे.
त्यामुळे अस्वस्थतेतून त्या शेरोशायरी करतात. संकटात शेरोशायरी करण योग्य नाही, या शेरोशायरी वरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वागणं माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला शोभत नाही. असे उमेश पाटील यांनी म्हटले आहे. उमेश पाटील यांनी एका मराठी वाहिनिशी बोलताना असे वक्तव्य केले.
More Stories
तिसरा अंक संपला
राज्यातले राजकीय नाट्य २१ जूनला सुरू झाले. मात्र, तब्बल आठ दिवस राज्यातला विरोधी पक्ष व या बंडाचा थेट लाभार्थी भाजप...
मुख्यमंत्री राजीनामा ?
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळून लावल्यानंतर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला असून, लगेचच मुख्यमंत्री थेट जनतेशी ऑनलाईन संवाद...
औरंगाबाद नामांतरावरून आघाडीत धुसफूस, शिवसेनेच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध!
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार संकटात आले असताना दुसरीकडे औरगांबाद जिल्ह्याच्या नामांतरावरून आघाडीत धुसफूस सुरू झाले असल्याचे समोर आले आहे....
पेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होणार
लखनौच्या जीएसटी परिषदेत महत्वपूर्ण निर्णय शक्य नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा परिषदेची (जीएसटी कौन्सिल) बैठक येत्या शुक्रवारी लखनऊमध्ये पार...
उद्ध्वस्त महाराष्ट्राला वाली कोण?
महाराष्ट्र उन्हाने करपलेला आहे. मृग नक्षत्र संपले…. पुढच्या दोन्ही नक्षत्रांनी धोका दिला. तिकडे चेरापुंजीत चार हजार मि.मि. पाऊस कोसळून गेला....
ठाकरे समर्थक रस्त्यावर उतरणार, बुधवारी रॅली
नांदेड : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभुमीवर येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी दि.२६ जून रोजी जिल्ह्यातील सेना पदाधिका-यांची...